
एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा
मुंबई :इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (आयजीआय) विमानतळावरील मुख्य धावपट्टी ११आर/२९एल ही सुमारे चार महिन्यांसाठी बंद राहणार आहे. धावपट्टीवरील तांत्रिक सुधारणा व पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
या कालावधीत विमानतळावरील उड्डाणे इतर धावपट्ट्यांवरून चालवली जाणार असली, तरी हिवाळ्यातील धुक्याच्या परिस्थितीत उड्डाणांना विलंब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेषतः सकाळ व रात्रीच्या वेळेत धुक्याचा परिणाम अधिक जाणवू शकतो.
प्रवाशांनी प्रवासापूर्वी संबंधित विमानसेवेशी संपर्क साधून उड्डाणांच्या वेळापत्रकाची माहिती घेण्याचे आवाहन विमानतळ प्रशासनाकडून करण्यात आले आहे. धावपट्टी सुधारणा पूर्ण झाल्यानंतर उड्डाणांची सुरक्षितता व कार्यक्षमता अधिक वाढेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
Ohh very good but passengers hv to keep patience