गांधीजीनी दिलेला अहिंसेचा संदेश सदैव दिशादर्शक – सय्यद अकबर

Share

प्रतिनिधी :वैशाली महाडिक

मुंबई,स्वातंत्र्याच्या लढाईत जहाल व मवाळ दोन्ही गट सक्रिय होते. पण स्वातंत्राच्या लढाईत गांधीजींनी दिलेला अहिंसेचा संदेश आज देखील दिशादर्शक आहे असे प्रतिपादन भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जेष्ठ पत्रकार सय्यद अकबर यांनी केले.
आज भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या माध्यमातून गांधी जयंती निमित्ताने त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पनवेल महानगरपालिका समोर गांधी उद्यानात सर्वप्रथम पुतळ्याला माल्यार्पण करून सर्वांनी वंदन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी देखील सातत्याने गांधीजींच्या व्यक्तिमत्व व विचारांना प्राधान्य दिल्याचे ते म्हणाले.
नविद पटेल,मुज्जू सय्यद,नुरा कच्छी,मतीन मास्टर,इस्माईल बागवान,हारून शेख आदी प्रमुख मान्यवरांसह नागरिक उपस्थित होते.


Share

One thought on “गांधीजीनी दिलेला अहिंसेचा संदेश सदैव दिशादर्शक – सय्यद अकबर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *