प्रतिनिधी : सुरेश बोर्ले
मुंबई : सध्या दुबई येथे आशिया कप २०२५ क्रिकेटचा थरार सुरू आहे.तर उत्कृष्ट चार संघ “बेस्ट ऑफ फोर”ह्या तालिकेत,पुन्हा पाकिस्तान व भारत हे संघ दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर भिडले.
प्रथम नाणेफेकीचा कौल आपल्या पदरात पडल्यावर, कर्णधार सूर्यकुमारने प्रथम गोलंदाजी स्वीकारली.पाकिस्तानी संघाने चांगली फलंदाजी करत!१७२ धावांचा डोंगर उभा केला. त्यामध्ये फहिमच्या ५८ धावा ह्या महत्वाच्या होत्या.भारताची फलंदाजीची सुरुवात तरणाबांड खेळाडू अभिषेक शर्मा ह्याने आफ्रिदिच्या पहिल्याच बाऊन्सर चेंडूवर फाइन लेगला षटकार ठोकून! पाकिस्तानी संघास विजयाची नांदी पेश केली. तर एका बाजूने नवयुवक व अनुभवी शुभमन गिलने चांगली साथ दिली.पण शारीरिक इजेमुळे तो लवकर बाद झाला,त्याने ४७ धावा केल्या. त्याचे अर्धशतक थोडक्यात हुकले. नंतर आलेल्या सुर्यकुमारने पुन्हा निराशा केली. आपला नेहेमीचा फटका खेळताना त्याने घाई केली व भोपळाही न फोडता तो बाद झाला.तर संजू सॅमसनही काही तग धरू शकला नाही.आपल्या वैयक्तिक १७ धावावर तो स्वसतात बाद झाल्यावर,
टिळक वर्मा आणि हार्दिक पांड्या ह्यांनी संयमी फलंदाजी करत!टिळक वर्माच्या विजयी फटक्याने १७२ ही विजयी धावसंख्या आरामात पार करीत भारताचा विजय नोंदवला.तमाम भारतीयांतर्फे भारतीय संघाचे अभिनंदन व पुढील खेळासाठी हार्दिक विजयी शुभेच्छा!
टॉय टॉयफिस्स झाल पाकचे
Great
Great v