
सामाजिक चळवळींना मोठा धक्का
एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक
मुंबई :ज्येष्ठ सामाजिक नेते, असंघटित कष्टकऱ्यांचे हिरवे सोने म्हणून ओळखले जाणारे मार्गदर्शक आणि सत्यशोधक चळवळीचे प्रणेते डॉ. बाबासाहेब पांडुरंग आढाव (बाबा आढाव) यांचे वयाच्या ९५व्या वर्षी उपचारादरम्यान आज निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते प्रकृतीच्या समस्यांनी त्रस्त होते आणि तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
बाबा आढाव यांनी आयुष्यभर असंघटित कामगार, वंचित, दलित, भटक्या-विमुक्त, शेतमजूर आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी लढा दिला. ‘एक गाव एक पाणवठा’ आंदोलन, वारकऱ्यांचे आंदोलन, बेघर आणि विस्थापितांसाठी चळवळ, तसेच ‘श्रमिक मुक्ती दल’ आणि ‘सत्यशोधक चळवळ’ यांच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक अन्यायांना आव्हान दिले.
त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील कामगार चळवळ, समाजवादी विचारसरणी आणि सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. समाजातील दुर्बल घटकांसाठी आयुष्य अर्पण करणारे बाबा आढाव यांची कार्याची परंपरा प्रेरणादायी ठरणारी असल्याची भावना विविध सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
त्यांच्या निधनानंतर राज्यभरातून श्रद्धांजलीचा ओघ सुरू असून पुढील काही तासांत अंत्यसंस्काराची माहिती जाहीर होण्याची शक्यता आहे.
Rest in peace sir
भावपूर्ण आदरांजली
विनम्र अभिवादन!!
Rip off