एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा
आठ कामगारांचा जळून मृत्यू; बेकायदेशीर उत्पादनाचा संशय, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
भिवाडी : राजस्थान मधील येथे एका रासायनिक फटाक्यांच्या कारखान्यात भीषण आग लागून आठ कामगार जिवंत जळून मृत्युमुखी पडल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. आगीची तीव्रता इतकी भीषण होती की काही मृतदेहांचे केवळ सांगाडेच हाती लागले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कारखान्याचा मालक राजेंद्र असल्याचे समोर आले असून, येथे रसायनांसोबत फटाकेही बेकायदेशीरपणे तयार केले जात होते, असा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या कारखान्याकडे आवश्यक परवाने होते का, याबाबत प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे.
शॉर्ट सर्किटमुळे आग?
आगीची माहिती मिळताच दमकल विभागाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी तातडीने बचावकार्य सुरू करून आग आटोक्यात आणली. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, कारखान्यात मोठ्या प्रमाणावर ज्वलनशील रसायनांचा साठा असल्याने आग वेगाने पसरली असावी, असा कयासही व्यक्त होत आहे.
सुरक्षा नियमांचे उल्लंघन?
या दुर्घटनेनंतर कारखान्यातील सुरक्षा उपाययोजनांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. कामगारांना आवश्यक सुरक्षासाधने, अग्निशामक यंत्रणा आणि आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग उपलब्ध होते का, याची चौकशी प्रशासनाकडून केली जात आहे.
स्थानिक प्रशासनाने मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
ही घटना औद्योगिक सुरक्षेकडे होणाऱ्या दुर्लक्षाचे गंभीर परिणाम अधोरेखित करणारी ठरली आहे.
Bhot bhot dannewad
Very sad and govtshould takestrictaction