राहुलजी गांधींशी भेटण्याचा क्षण अविस्मरणीय:काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस.

Share


भारतयात्रींबरोबरचा अनुभव आयुष्यभरसाठी आठवण.
प्रतिनिधी :मिलन शाह
काँग्रेस नेते खा. राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखालील कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रेला महाराष्ट्रातील जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. समाजातील सर्व जाती-धर्माचे लोक या पदयात्रेत सहभागी होत आहेत असे मातंग समाजाचे नेते व काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी म्हटले आहे.
भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाल्यापासून श्री राजहंस या ऐतिहासिक पदयात्रेत चालत आहेत. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची या पदयात्रेदरम्यान वाशिम येथे भेट घेऊन संवाद साधण्याची संधी मिळाली. यावेळी मागासवर्गीय समाजाच्या प्रश्नांवर राहुलजी यांच्याशी चर्चा केली. राहुलजी यांच्याशी भेटून चर्चा करण्याचा अनुभव वेगळाच आनंद देणार ठरला. भारतयात्रींबरोबर दररोज चाललो तो अनुभव आय़ुष्यभरची आठवण ठरेल असा आहे.
लोकांमध्ये नवा जोश व उत्साह संचारला आहे तसेच सर्व समाजातील लोकांचाही उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे त्यामुळेच विरोधकाकंडून राहुलजी गांधी यांच्या प्रत्येक हालचालीतून त्रुटी शोधून टीका करण्याचे काम केले गेले परंतु राहुलजी किंवा पदयात्रेला मिळणाऱ्या प्रतिसादावर याचा काडीचाही परिणाम झाला नाही उलट लोकांचा प्रतिसाद वाढत आहे.
लोकशाही व्यवस्था,संविधानाला धाब्यावर बसवून भाजपा सरकार काम करत आहे. लोकशाही व्यवस्था व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान वाचवण्याच्या या लढाईत आपलाही सहभाग असला पाहिजे म्हणून लोकांला प्रतिसाद वाढत आहे.
भारत जोडो यात्रेतून देशातील एकता व विविधता अबाधित ठेवण्याचे कामही होत आहे.भारत जोडो यात्रेची दखल अनेकांना घ्यावी लागत आहे. या पदयात्रेमुळे देशातील राजकीय, सामाजिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होण्यास मदत होईल व राहुल गांधी यांचे नेतृत्वही एका मोठ्या उंचीवर जाईल असा विश्वास राजहंस यांनी व्यक्त केला.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *