
विशेष प्रतिनिधी :
महाराष्ट्र,वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी यांच्यावर नगर येथे लोखंडी रॉड ने जीवघेणा हल्ला करण्यात आला त्यात ते जबर जखमी झाले आहेत. सुदैवाने ते
बालंबाल बचावले . अहमदनगर येथे जीवघेणा हल्ला करण्यात आला. शाळेच्या आवारात तंबाखू, गुटखा,नशेचे पदार्थ विक्रीसाठी ठेऊ नयेत म्हणून त्यांनी आवाज उठवला होता.
हेरंब कुलकर्णी यांच्यावर शनिवारी दुपारी 12.18 मिनिटांनी शाळेतून परत जाताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. आजारी असल्याने शाळेतून घरी सुनिल कुलकर्णी या शिक्षक मित्राच्या गाडीवर येताना अहमदनगर येथे रासने नगर जवळ जोशी क्लासेसजवळ तीन तरुणांनी गाडी अडवून लोखंडी रॉडने मारहाण केली.गाडी अडवून लोखंडी रॉडने दोन्ही पायावर
दोन्ही हातावर पाठीवर आणि डोक्यात रॉडने मारहाण केली. डोक्याला 4 टाके पडले आहेत. डोक्यावर चा दुसरा फटका सुनिल कुलकर्णी यांनी हाताने अडवला त्यामुळे ते बचावले.अन्यथा डोक्यावर जबर मार बसला असता.ते रस्त्यावर पडले.
त्यानंतर त्यांनी सिव्हील हॉस्पिटल ला उपचार घेतले व तोफखाना पोलीस चौकीत गुन्हा दाखल केला. पण 48 तासात पोलिसांनी कोणालाही अटक केली नाही की अजूनही CCTV फॉलोअप घेतला नाही. त्यामुळे आज ही घटना समाजाच्या समोर मी मांडत आहे. अशी व्यथा त्यांच्या पत्नी प्रतिमा कुलकर्णी यांनी समाज माध्यमावर व्यक्त केली आहे.
सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीला रस्त्यात अडवून रॉड ने जीवघेणा हल्ला करणे हे खूप उद्विग्न करणारे आहे.
आपण सर्वांनी शासनाकडे या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधावे…
सर आता झोपून आहेत पण तब्येत ठीक आहे.
प्रतिमा कुलकर्णी
या भ्याड हलल्याचा समाजातील सर्व थरातून संताप व्यक्त होत आहे. तसेच मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी त्वरित जातीने लक्ष देऊन कारवाई चे निर्देश पोलीस प्रशासनाला द्यावे अशी मागणी अनेक मान्यवर करत आहेत.
हेरंब कुलकर्णींवरील भ्याड हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. तर शाळा व्यवस्थापन व पोलीस यांचाही निषेध करतो.