प्रतिनिधी : मिलन शहा
मुंबई : ईडीने आज दिल्ली आणि मुंबईतील अनिल अंबानी ग्रुपच्या (आरएजीए कंपन्या) अनेक ठिकाणी एकाच वेळी मोठी कारवाई सुरू केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात सीबीआयने नोंदवलेल्या दोन एफआयआरनंतर हे छापे टाकण्यात आले आहेत.ईडीच्या सुरुवातीच्या तपासात असे दिसून आले आहे की सार्वजनिक पैशाचा मोठा गैरवापर करण्यात आला आहे. २०१७ ते २०१९ दरम्यान येस बँकेकडून सुमारे ३००० कोटी रुपयांचे बेकायदेशीर कर्ज वळवण्यात आले. कर्ज मिळण्यापूर्वीच येस बँकेच्या प्रवर्तकांना मोठी रक्कम हस्तांतरित करण्यात आली, ज्यामुळे लाचखोरी आणि फसवणुकीचे खोल जाळे उघड झाले आहे. ईडीला असे आढळून आले की कागदपत्रांशिवाय, योग्य ती काळजी न घेता कर्जे देण्यात आलीसीएएम जुन्या तारखेला देण्यात आले,.शेल कंपन्यांना पैसे पाठवण्यात आले प्रमोटर ग्रुप कंपन्यांकडे वळवले.सामान्य संचालक, एकाच पत्त्यावर अनेक कंपन्या?एका वर्षात आरएचएफएल कर्जे ₹३,७४२ कोटींवरून ₹८,६७० कोटींपर्यंत वाढली ईडीच्या छाप्यात ३५ हून अधिक ठिकाणे, ५० कंपन्या आणि २५ हून अधिक लोक तपासाखाली आहेत. हे प्रकरण स्पष्टपणे एका मोठ्या बँकिंग घोटाळ्याकडे निर्देश करत आहे. तपास सुरू आहे!!
नुसतेच छापे की कारवाई?